“…म्हणून स्वत:ला हिंदू म्हणवून घेणाऱ्या स्त्रियांनी रोज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पायांचं पूजन कराव”

पुणे | ज्या स्त्रिया स्वत:ला हिंदू  म्हणून घेतात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पायाचं पूजन करायला हवं, असं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केलं आहे. पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘हिंदू मॅरेज कोड’चा आग्रह धरला नसता तर हिंदू स्त्रियांचे काय झालं असतं याची कल्पनाही करवत नाही. त्यामुळे स्वत:ला हिंदू म्हणवून घेणाऱ्या स्त्रियांनी रोज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पायांचं पूजन केलं पाहिजे, असं विक्रम गोखले यांनी म्हटलं आहे.

एखाद्या व्यक्तीला समाजपुरुष मानणे हा आपला सामाजिक दोष आहे. एखाद्याला देवत्व देऊन आपण धन्य होतो. पण तीही माणसंच आहेत. ती चुकू शकतात. त्यांनी काय चांगलं केलं त्याचं स्मरण ठेवलं पाहिजे, असंही विक्रम गोखले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हिंदू समाज कधीही एकत्र येत नाही, हा इतिहास आहे. त्यामुळेच 1400 वर्षे आपण गुलामगिरीत जगलो. हिंदुंनो देशावर खरं प्रेम असेल तर किंवा पुढच्या पिढीवर उपकार म्हणून तरी सर्व भेद विसरून एकत्र या, असं आवाहनही गोखले यांनी केलं.

महत्वाच्या बातम्या- 

-श्वानाने केलं मंदीर मंत्रमुग्ध; गायले परफेक्ट सुरात अभंग

-आशिषजी बाप बाप असतो; सचिन आहेर शेलारांवर भडकले

-मुंबईतील वर्सोवा भागात मनसे कार्यकर्त्यांनी बांगलादेशी घुसखोरांना दिला इशारा

-सहकारमंत्र्यांच्या रॅलीत सोनं आणि पाकीट चोरी करणाऱ्या टोळीला कराडमध्ये अटक

-राजधानी काबीज करण्यासाठी भाजपची टीम दिल्लीदरबारी