नवी दिल्ली | केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार आल्यापासून दहशतवाद्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून दहशतवादी बिर्याणी नव्हे तर गोळ्या खात आहेत, असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.
जम्मू काश्मीरमध्ये जे लोक दहशतवाद्याचं समर्थन करत आहेत. तेच लोक आता शाहीनबागेत आंदोलन करत आहेत. आझादीच्या घोषणा देत आहेत, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.
लोकशाहीची सर्वात मोठी शक्ती ही बॅलेट आहे, बुलेट नाही. त्यामुळे तुम्ही बॅलेटमधून केजरीवाल सरकारला धडा शिकवा, असं आवाहन योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीकरांना केलं आहे.
दरम्यान, योगी आदित्यनाथ कालपासून दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. दिल्लीत त्यांच्या अनेक ठिकाणी सभा आयोजित करण्यात आल्या असून प्रत्येक सभेतून ते केजरीवाल आणि काँग्रेसवर निशाणा साधत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-राष्ट्रवादीला दुष्काळाचा विसर; गटनेत्याच्या वाढदिवसाला हजारो लिटर पाण्याची नासाडी!
-105 आमदारांचं तुणतुणं वाजवणाऱ्या फडणवीसांना अजित पवारांचं खास उत्तर!
-गोमूत्र अन् शेणाचं सेवन केल्यास कोरोना व्हायरसचा संसर्ग होणार नाही; हिंदू महासभेचा अजब दावा
-बजेटवर टीका करताना राहुल गांधींना आठवला मोदींचा व्यायाम! म्हणाले…
-न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीत जाऊन भारताने लोळवलं! ऐतिहासिक व्हाईटवॉश….