पतीच्या निधनानंतर अभिनेत्री पहिल्यांदाच दुसऱ्या लग्नाविषयी बोलली, म्हणाली….

मुंबई| ‘खुलता कळी खुलेना’ या झी मराठी वाहिनीवरील मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरांमध्ये जाऊन पोहचलेली सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे मयुरी देशमुख. मयुरीनं नाटक, मालिका यांमध्ये तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत.

मयुरी सध्या स्टार प्लसवरील हिंदी मालिका ‘इमली’ यामध्ये प्रमुख भूमिकेत काम करतेय. नुकतीच मयुरीने ‘टाईम्स ऑफ इंडियाला’ एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने तिच्या आयुष्यातील काही गोष्टी शेअर केल्या आहेत.

मयुरीने 2017 मध्ये आशुतोष भागरे याच्याशी लग्न केले होते. आशुतोष भागरेदेखील एक अभिनेता होता. मात्र मयुरीच्या नवऱ्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. आशुतोषने नैराश्येतून आपले जीवन संपवण्याचा माहिती समोर आली होती.

मागील वर्ष 2020 माझ्यासाठी, माझ्या घरातील प्रत्येकासाठी अतिशय कठीण होतं. आशुतोष आम्हाला कायमचा सोडून गेला. त्याचं जाण्याचं दुःख हे आभाळ कोसळण्यासारखंच होतं. पण यातून सावरणं गरजेचं होतं. माझ्या कुटुंबातील सर्वांनी आणि माझ्या मित्रमैत्रिणींनी या दुःखातून मला बाहेर पडायला मदत केली आणि मी पुढच्या प्रवासाला सुरुवात केली, असं मुलाखती दरम्यान मयुरीनं सांगितलं आहे.

मयुरीने तिच्या भविष्याबाबत काय विचार केला आहे हे नुकतेच तिने एका मुलाखतीत सांगितले आहे. मयुरी सांगते, मी आजही त्याच्यावर प्रेम करते आणि आजही तो माझ्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे. त्याच्या प्रेमासोबत मी एकटी राहू शकते. तो गेल्यानंतर मी काही मुलं दत्तक घेण्याचा विचार करतेय. मुलांसाठी दुसरं लग्न करण्याची काय आवश्यकता आहे?

मयुरीने लिहिलेले ‘डिअर आजी’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे नाटक प्रेक्षकांना विविध प्लॅटफॉर्मवर पाहण्याची संधी मिळणार आहे. मयुरीने तीन वर्षांपूर्वी हे नाटक लिहिले होते. या नाटकात भारतातील आजोबा आणि अमेरिकेत वाढलेली नात यांच्यातील नातेसंबधावर भाष्य करण्यात आलं आहे.

दरम्यान, अभिषेकने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबूकवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये  एक व्यक्ती, आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतो?, यासंदर्भात काही मााहिती सांगताना दिसत होती. मात्र आशुतोष असा निर्णय असं कोणालाच वाटलं नव्हतं.

 

महत्वाच्या बातम्या – 

कोल्हापूरात प्रवाशांवरून रिक्षा चालकांची तूफान हाणामारी,…

भुकेलेल्या सिंहाने पर्यटकांच्या गाडीवर घेतली झेप अन्…,…

जाणून घ्या! कोणत्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे उत्तम

महाराष्ट्र दिन यंदाही साधेपणानेच; राज्य सरकारच्या सूचना जारी

IPL 2021: चेन्न्ईचा सलग पाचवा विजय, चेन्नईची टीम पॉईंट्स…