नवी दिल्ली : नोटाबंदी आणि जीएसटी यांसारखे धाडसी निर्णय राबवणारे देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं 9 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले गेले, पण त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेटली यांच्या निधनानंतर देशातील राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
‘नरेंद्र मोदींना दिल्लीचा मार्ग दाखवणारे अरुण जेटली आहेत. मोदींसारखं नेतृत्व देशपातळीवर आलं पाहिजे, असा आग्रह सर्वप्रथम मांडणारे अरुण जेटली आहेत, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं.
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी माझा मोठा भाऊ गेला, अशा शब्दात जेटलींच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.
ते केवळ भाजप किंवा शिवसेनेचं नसून देशाचे नेते होते.देशावरील संकटांवेळी ते नेहमीच धावून आले आहेत. आंतराराष्ट्रीय पातळीवर देशाची बाजू प्रभावीपणे ते मांडत असत. क्रिकेट, उद्योग आणि राजकारणापलिकडील श्रेत्रातही त्यांचा प्रामुख्याने वावर होता. शिवसेनेसोबत 2014 साली भाजपाचे संबंध तुटल्यानंतर अस्वस्थ झालेले नेते अरुण जेटली होते. घटकपक्षांना सन्मान देण्याची त्यांची आग्रही भूमिका होती.
सुषमाजींच्या निधनानंतर अरुणजींचं जाणं हे देशाच्या राजकारणातील दोन मोठे स्तंभ कोसळण्यासारखं आहे. आज आमचा मोठा भाऊ गेला, अशा शब्दात संजय राऊत यांनी जेटलींटच्या निधानानंतर शोक व्यक्त केला आहे.
“प्रदीर्घ संसदिय अनुभव असणारे अभ्यासू नेतृत्व काळाच्या पडद्याआड” https://t.co/MtNLENV4vM #ArunJaitley
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 24, 2019
देशाचे माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांचं निधन- https://t.co/vM8Qjk6SqT #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 24, 2019
देशाचे माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांचं निधन pic.twitter.com/vIaZBxx1AZ
— थोडक्यात (@thodkyaat) August 24, 2019