जेटलींची कमी देशाला नेहमी जाणवेल; नितीन गडकरींची भावूक प्रतिक्रिया

नवी दिल्ली | देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं आहे. जेटली यांच्या निधनानंतर देशातील राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

अरूण जेटलींच्या जाण्याने मी शब्द निशब्द झालोय. अरूण जेटलींची कमी देशाला नेहमी जाणवेल, अशी भावूक प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.

आमच्या दोन मोठ्या नेत्यांचं एकामागोमाग जाणं आमच्यासाठी मोठा धक्का आहे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं 9 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले गेले, पण त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

महत्वाच्या बातम्या-