आशिष शेलारांचं राज ठाकरेंबद्दल सूचक वक्तव्य; म्हणतात…

मुंबई : मनसेने विधानसभा निवडणूक संपूर्ण ताकदनिशी लढण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर वांद्रे येथे एमआयजी क्लबमध्ये मनसेच्या पदाधिकारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यापूर्वी अनेक तर्कवितर्क लढवले जात असताना भाजपचे नेते आशिष शेलारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.

राज यांच्या व्यक्तीगत स्वभावानुसार ते गप्प बसणार नाहीत असं मला वाटत, असं मत शेलार यांनी व्यक्त केलं आहे. तसेच राज ठाकरेंनी खोटा प्रचार करू नये, असा इशाराही शेलार यांनी राज ठाकरेंना दिला आहे.

खोट्या विधानांवरुन प्रचार करण्याचा राज यांचा विचार असेल तर त्यांना मी इतकचं सांगेन की अभी तो पिक्चर बाकी है मेरे दोस्त, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे किती जागा जिंकतील यापेक्षा ते निवडणूक लढवतील की नाही हा प्रश्न आहे, असं आशिष शेलार म्हणाले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मनसेच्या झालेल्या बैठकींमध्ये विधानसभा निवडणुकीत मनसे 100 जागा लढवणा अशी चर्चा होती. मात्र पक्षाकडून तसेच राज ठाकरे यांच्याकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली  नाही.

महत्वाच्या बातम्या-