“इकडे एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी, तिकडे आदित्य ठाकरेंची स्कॉटलंड वारी”

मुंबई | भाजपचे कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी याच मुद्द्यावरुन पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

स्कॉटलंड देशातील ग्लास्गो येथे आयोजित पर्यावरण बदल परिषदेस कोणतेही अधिकृत निमंत्रण नाही. तरीही राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणाच्या नावाखाली निकटच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत पर्यटन करण्याचं चालवलं आहे, असं म्हणत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

इकडे एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी, अन् आदित्य ठाकरेंची पर्यावरणाच्या नावाखाली विना निमंत्रण जनतेच्या पैशावर स्कॉटलंड वारी, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.

​या परिषदेला केवळ देशाच्या प्रमुखांनाच परवानगी आहे. असं असूनही आदित्य ठाकरे हे कोणत्या अधिकारात ग्लास्गोला गेले होते? त्याचे त्यांना निमंत्रण होते का? राज्यात मागील तीन आठवड्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असताना परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार यांना सहकुटुंब सोबत घेऊन जाण्याचे कारण काय?, असा सवाल त्यांनी केला आहे.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अधिकाऱ्यांचा खर्च जनतेच्या पैशातून का करण्यात आला? एवढा लवाजमा सोबत नेत आदित्य ठाकरे यांनी त्या परिषदेतून महाराष्ट्रासाठी काय आणले? अशी प्रश्नांची सरबत्तीच भातखळकर यांनी केलीय.

मुंबईसह राज्यातील आठ शहरांना वायू प्रदूषणाचा विळखा पडलेला आहे. अतिविषारी प्रदूषणामुळे दिवसागणिक शेकडो नागरिक आजारी पडत आहेत, असं असतानाही राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे केवळ पर्यटनात मग्न असल्याचा टोलाही भातखळकर यांनी लगावला आहे.

या संपूर्ण पर्यटन दौऱ्याचा खर्च हा मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडूनच वसूल करावा, अशी मागणीही अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारकडे केली आहे,

दरम्यान, सरकार या संपावर मार्ग काढण्याऐवजी भीती दाखवण्याचं काम करत आहे. रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या नोटीसा देत आहे. त्यांना निलंबनाच्या नोटीसा देत आहे. आम्ही सरकारला सहकार्य करायला तयार आहोत. पण तुम्ही विलिनीकरणाच्या मुद्द्यावर काही बोलतच नसाल तर त्यातून मार्ग कसा निघेल, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केलीये.

महत्त्वाच्या बातम्या-

“मला आता रडू येतंय, मी वेगवेगळ्या पातळ्यांवर लढतोय” 

मोठी बातमी! एसटी महामंडळाचं खासगीकरण होण्याची शक्यता

 “अरे कुटुंबच्या कुटुंब रस्त्यावर आलं, त्यातही राजकारण करायला लाज वाटली नाही का?”

“शिवसेनेच्या भ्रमाचा भोपळा फुटलाय, त्यांना वाटायचं भाजप…”

 ‘दुसरा गाल पुढं करणं हे भीतीचं लक्षण नाही तर…’; कंगनाला मिळालं जोरदार प्रत्युत्तर