मुंबई | गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि इतर सहा जणांचा शिवाजी पार्कवर शपथविधी पार पडला. मात्र, शपथविधी सोहळ्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती मिळत आहे.
शपथविधी सोहळ्यात प्रोटोकाॅलनुसार व्यवस्था करण्यात आली नव्हती. शपथविधी सोहळ्याची व्यवस्था प्रशासनाला करु दिली नाही. त्यामुळे मंचावर अनेक त्रुटी पाहायला मिळाल्या, असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शपथ घेताना आमदारांनी सुरुवातीला आपल्या नेत्यांची नावं घेतली, यावरही भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेप घेतला आहे. भविष्यात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात असे प्रकार घडू नयेत. अशा कृत्यांमुळे सोहळ्याची प्रतिष्ठा खालावते, असं राज्यपालांचं म्हणणं आहे.
शपथविधीदरम्यान मंचावर असणाऱ्या अव्यवस्थेवर राज्यपालांना नाराजी व्यक्त केली असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे याबाबत आक्षेप नोंदवला असल्याची माहिती मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
शिवसेनेने बाळासाहेबांचा आत्मा सोनिया गांधींकडे गहाण ठेवलाय; भाजपचं टीकास्त्र https://t.co/JSJvU3EHmE @ShivSena @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 29, 2019
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाची मंत्रालयातील केबिनबाहेर लागली पाटी https://t.co/XmtraQLrua @uddhavthackeray @ShivSena #CM
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 29, 2019
महाराष्ट्रापाठोपाठ आता गोव्यातही राजकीय भूकंप होणार; संजय राऊतांना विश्वास https://t.co/57pDSQOkh5 @rautsanjay61 @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 29, 2019