उस्मानाबाद | वारकरी सांप्रदाय संपवण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीचा डाव आहे. त्यामुळेच काँग्रेस राष्ट्रवादीवाले इंदुरीकर महाराजांवर टीका करत आहेत, असा आरोप करत भाजप आता इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ मैदानात उतरलं आहे.
धार्मिक ग्रंथ आणि गुरूचरित्राच्या आधारेच इंदुरीकर महाराज बोलत आहेत, असा दावा भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला आहे. इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनात जे दाखले देत आहेत ते ग्रंथांच्या आधारेच देत आहेत, असं कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे महाराजांच्या समर्थनार्थ त्यांचे चाहते तसंच भक्तमंडळी मैदानात उतरले आहेत. आज इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या चाहत्यांसाठी आणि भक्तांसाठी एक खास पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी शांततेचं आवाहन केलं आहे.
वारकरी सांप्रादाय हा शांतताप्रिय आहे. आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी महाराजांनी पत्र लिहिलं आहे. कोणतीही रॅली, मोर्चे तसंच आंदोलन करू नका, असं आवाहन त्यांनी पत्राच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-इंदुरीकर महाराजांनी लिहिलं आपल्या लाखो चाहत्यांना पत्र; पत्रात म्हणतात…
-“शरद पवार हे मागासवर्गीय आणि आदिवासींच्या विरोधात आहेत”
-भाजपच्या मंचावरून मी शरद पवारांना चॅलेंज देतो की….- देवेंद्र फडणवीस
मला विश्वास आहे, आबांचं काम रोहित पुढे घेऊन जाणारच- इंदुरीकर महाराज
-आर. आर. आबा आणखी 20 वर्ष राजकारणात पाहिजे होते- इंदुरीकर महाराज