“बाळासाहेबांची विचारधारा विकून शिवसेनेची ‘सोनिया सेना’ झाली आहे, किती लोकांची तोंड तुम्ही बंद करणार आहात?”

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर अभिनेत्री कंगना राणावत चांगलीच चर्चेत आहे. कंगनानं मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीर सारखं वाटत असल्याचं वक्तव्य केलं होतं. कंगनाच्या या वक्तव्यामुळं शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी कंगनावर टिका करायला सुरुवात केली होती.

गेल्या काही दिवसांपासून कंगना आणि शिवसेना नेते यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाची खेळी चांगलीच रंगली आहे. कंगनानं आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

स्व. बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा विकून शिवसेनेची ‘सोनिया सेना’ झाली आहे. तसेच तुम्ही माझा आवाज बंद केला तरी माझ्या नंतर हाच आवाज लाखो लोकांचा होईलं, अशी जहरी टीका कंगनानं शिवसेनेवर केली आहे. यासंदर्भात कंगनानं आज सकाळी ट्वीट केलं आहे.

श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचारसरणीवर शिवसेनेची निर्मिती केली होती. तीच विचारसरणी विकून शिवसेनेची आज ‘सोनिया सेना’ झाली आहे. ज्या गुंडांनी माझ्या पाठीमागे माझं घर तोडलं त्यांना नागरी संस्था म्हणू नका, भारताच्या संविधानाचा इतका मोठा अपमान करू नका, असं कंगनानं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

तुमच्या वडिलांची चांगली कृत्ये तुम्हाला संपत्ती देऊ शकतात, पण तुम्हाला आदर स्वतःला मिळवावा लागेल. तुम्ही माझं तोंड बंद कराल पण माझ्या नंतर हाच आवाज लाखो लोक उठवतील, तुम्ही किती लोकांची तोंड बंद करणार आहात? किती लोकांचे तोंड तुम्ही दाबणार आहात? केव्हापर्यंत तुम्ही सत्त्यापासून पळणार आहात? तुम्ही फक्त वंशवादाचा एक नमुना आहात, असंही कंगना राणावतनं म्हटलं आहे.

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाचं आणि माझं वैयक्तिक काहीच वाद नाही, असं स्पष्ट केलं आहे. मात्र तरीही कंगनानं शिवसेनेवर आपली टिका चालूच ठेवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांतप्रकरणी मोठी बातमी! भायखळा तुरुंगात रियाची रवानगी होणार

“काहीच पुरावे नसताना रियाला फाशी दिली जातेय, कोणताही बाप हे सहन करू शकत नाही”

रियानं ड्रग्जचं सेवन का केलं?; रियानं स्वतः केला हादरवून टाकणारा खुलासा!

राणी लक्ष्मीबाईंच्या पावलावर चालतेय, ना वाकणार, ना घाबरणार; कंगणा निघाली मुंबईला!

“केंद्र सरकार राज्याला कर्जाच्या खाईत ढकलण्याचा प्रयत्न करत आहे”