नवी दिल्ली | भाजपचा टोल फ्री क्रमांक हा नेटफ्लिक्सचा नसून तो पक्षाच्या नावाने नोंदणी असलेला क्रमांक आहे, असं स्पष्टीकरण देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलं आहे.
मागील काही दिवसांपासून केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याला देशभरातून विरोध होताना दिसत आहे. म्हणूनच या कायद्याला भारतीयांचा पाठिंबा मिळावा म्हणून भाजपने टोल फ्री क्रमांकावर फोन करुन तुमचा पाठिंबा नोंदवा ही मोहिम सुरु केली होती.
सुधारित नागरिकत्व कायद्याला जास्तीत जास्त भारतीयांचा पाठिंबा मिळावा म्हणून भाजपने काही दिवसांपूर्वीच 8866288662 हा टोल फ्री क्रमांक जारी केला. या क्रमांकावरुन मीस कॉल देऊन सीएए कायद्याला पाठिंबा द्या, असं आवाहन भाजपने केलं होतं.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुधारित नागरिकत्व कायदा आणला आहे. या कायद्याला कॅबिनेटने मंजूरी दिली, लोकसभेमध्येही या कायद्याला पाठिंबा मिळाला. मात्र केजरीवाल, राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रासारख्यांनी जनतेची दिशाभूल करण्याची आणि दंगल घडवून आणण्याची कामं केली, असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
“फडणवीस यांच्या इतका लबाड आणि खोटारडा नेता जगाच्या पाठीवर सापडणार नाही” – https://t.co/Jb0CdJ1Chq @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @Anil_gote @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 6, 2020
“उदय सामंत यांची पदवी खरी असेल पण हा माणूस 100 टक्के बोगस” – https://t.co/zk2hKNXfQa @meNeeleshNRane @meudaysamant @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 6, 2020
“हल्लेखोरांच्या चेहऱ्यावरील बुरखा हटवून खरे चेहरे समोर यायला हवेत” – https://t.co/g1cnTmbxHd @OfficeofUT @ShivSena #JNUattack
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 6, 2020