अजित पवार मुख्यमंत्री असल्यासारखं वागतात; चंद्रकांत पाटील यांची टीका

कोल्हापूर | अजित पवार हे मुख्यमंत्री असल्यासारखं वागत आहेत. तेच रोज रोज कोणतीही घोषणा करतायेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फिरताहेत फॉरेनला…. एकवेळ त्यांना राग नक्की येईल आणि म्हणतील मी मुख्यमंत्री आहे…. माझं काय आहे की नाही?, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

घटना ही बाबासाहेबांनी अश्याप्रकारे लिहीली की पुढची शेकडो वर्ष ती चालेल. त्यामध्ये केंद्र आणि राज्य संबंध कसे असले पाहिजे.. केंद्राचे अधिकार कोणते…. राज्याचे अधिकार कोणते हे सगळं त्यात लिहिलं आहे. महाराष्ट्रामध्ये जर केंद्राची चौकशी समिती अली तर त्याला आम्ही सहकार्य करणार नाही. म्हणजे देशाचं विघटन करण्याचा प्रयत्न चाललाय काय? केंद्र नावाची काही रचना नाही का? केंद्राच्या चौकशी पथकाला सहकार्य करावंच लागेल, अशी भूमिका त्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर मांडली.

तुम्हाला ज्याची चौकशी करायचीये त्याची चौकशी करा कारण तुमचं सरकार कमी कालावधीचं आहे. लवकर तुमच्या चौकश्या आटपा, अशी उपरोधिक टीका त्यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.

दरम्यान, भीमा कोरेगाव प्रकरणी जर केंद्राला सहकार्य केले नाही तर कायदेशीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देखईल त्यांनी सरकारला दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-तो व्हिडीओ पाहून रितेश हळहळला; नेटकऱ्यांकडे मागितला व्यक्तिचा फोन नंबर!

-भीमा कोरेगाव प्रकरणी भाजप-राष्ट्रवादीत जोरदार सामना; फडणवीस म्हणतात…

-‘या’ मराठी अभिनेत्याला शरद पवार यांची भूमिका साकारायचीये!

-“कोरेगाव भीमा प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची चौकशी करा”

-पडद्यावरच्या खलनायकानं ठेवला जनतेसमोर एक नवा आदर्श