मुंबई | ज्या पक्षाच्या कार्यकाळात कित्येक युद्ध जिंकण्यात आली, तो पक्ष देशाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत राजकारण करण्याचा प्रश्नच येत नाही, असं म्हणत काँग्रेसने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना उत्तर दिलंय.
ज्या काँग्रेस पक्षाने 50 वर्षांपेक्षा जास्त काळ सत्तेमध्ये घालवला, ज्या पक्षाच्या कार्यकाळात कित्येक युद्ध झाली, युद्ध जिंकण्यात आली, तो पक्ष देशाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत राजकारण करतो, त्याचा प्रश्नच येत नाही, असं काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे म्हणाले.
पुलवामानंतर कोणी राजकारण केलं असेल आणि सैन्याला पुढे करुन कोणी मतं मागितली असतील तर ती भाजपने. अशा प्रकारचे घाणेरडे राजकारण ना कधी काँग्रेसने केले, ना आता करतंय, असा दावाही राजू वाघमारे यांनी केला. आहे.
आमचे नेते राहुल गांधी तेच म्हणत आहेत, चीनने घुसखोरी केली की नाही ते सांगा, आमचे 20 जवान कसे शहीद झाले ते सांगा, कारण गृहमंत्री सांगत आहेत घुसखोरी झाली, चार दिवसानंतर पंतप्रधान सांगतात घुसखोरी झालेली नाही. तोच प्रश्न आम्ही विचारत आहोत, असं वाघमारेंनी म्हटलंय.
चीन घुसखोरी व 20 जवान शहीद या प्रश्नाचे काँग्रेस राजकारण करत आहे का? याचे अचूक उत्तर व यावर खरे कोण व का राजकारण करीत आहे? ते पहा व शेअर करा @INCMaharashtra @INCMumbai @BJP4Maharashtra @bb_thorat @AshokChavanINC @TV9Marathi @SATAVRAJEEV @ANI @SakalMediaNews @abpmajhatv @MiLOKMAT pic.twitter.com/9oCfgWcQsC
— Dr. Raju waghmare (@drrajuwaghmare) June 28, 2020
महत्वाच्या बातम्या-
-30 जूननंतर लॉकडाउन उठणार का?, उद्धव ठाकरे म्हणाले…
-पांडुरंग समजून पोलिसाचे पाय धरणारा वारकरी; सोशल मीडियावर व्हीडिओ तुफान व्हायरल
-आपल्या मुलांसाठी देश लुटायला कोणतीही कसर सोडली नाही, स्मृती इराणींचा सोनियांवर हल्लाबोल
-…म्हणून नागपुर, मालेगाव आणि धारावीतला कोरोना आटोक्यात, राजेश टोपेंचा महत्त्वाचा खुलासा
-गुन्हे सिद्ध करण्यात लॅबचे महत्वपूर्ण योगदान, गृहमंत्री अनिल देशमुखांचे कौतुकोद्गार