त्यांच्यातच संवाद नाही… ते आमच्याशी काय संवाद साधणार??- देवेंद्र फडणवीस

मुंबई | ठाकरे सरकारमधील पक्षांमध्ये आपसांतच सुसंवाद नाही. ते बोलतात एक आणि करतात एक. त्यामुळे त्यांनी आधी आपापसात संवाद साधावा. मग आम्हाला चहापानासाठी अन् संवादासाठी बोलवावं, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर शाब्दिक हल्ला चढवला.

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काहीही मदत मिळालेली नाही. आम्ही केलेल्या कर्जमाफीला नावं ठेवली तीच पद्धत यांनी आत्मसात केली. महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अशी टीका फडणवीसांनी यावेळी केली.

दरम्यान, सरकारची अजूनही कोणतीच दिशा ठरत नाही आणि तिन्ही पक्षांना सूरही गवसत नाही. येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्याचे संकेत फडणवीसांनी दिले.

महत्त्वाच्या बातम्या-

-मराठा तरूणांना नियुक्त्या न मिळणं हे दुर्दैवी- देवेंद्र फडणवीस

-नवी मुंबई निवडणुकीपूर्वी फडणवीसांना धक्का… शिवसेनेसाठी गुडन्युज!

-आतापर्यंत या 2 व्यक्तींसाठीच मी माझ्या खिशातल्या पैशांनी हार विकत घेतलाय- गडकरी

-छत्रपती संभाजी महाराजांच्या अटकेनंतरचा इतिहास दाखवाच कारण…- राणुआक्का

-ठाकरे सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात