“देवेंद्र फडणवीस वर्षभरात पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होतील”

कोल्हापूर | राज्याच्या राजकारणात आपल्या वक्तव्यांनी वेळोवेळी खळबळ माजवणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाबाबत वक्तव्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार कोसळण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याबाबत भाजपचे झालेले प्रयत्न कोणापासून लपून नाहीत. अशातच पाटील परत एकदा वक्तव्य करत चर्चेत आले आहेत.

देवेंद्र फडणवीस हे वर्षभरात राज्याचे मुख्यमंत्री होतील, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. आजरा येथील कार्यक्रमात बोलताना पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे.

चंद्रकांत पाटील हे राज्याच्या राजकारणात आपल्या वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. पाटील यांनी पक्षातील नेत्याबाबत आशावाद व्यक्त करण्यात काय चुक आहे?, असा सवाल देखील उपस्थित केला आहे.

पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना काही दिवसांपूर्वी पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार कोसळण्याबाबत ठाम विश्वास व्यक्त केला होता.

ठाकरे सरकार आणि भाजपमध्ये सध्या विविध मुद्द्यांवरून जोरदार वाद पेटलेला असताना आता अशाप्रकारचं वक्तव्य करण्यात आल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, भोंगे, हनुमान  चालीसा, राणा दाम्पत्य प्रकरण यावरून राज्यात मोठा राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे. अशातच पाटील यांच्या वक्तव्याची भर पडली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 पंजाबमध्ये मोठा राडा! शिवसेना आणि शीख संघटना एकमेकांना भिडले, SHO जखमी

“…तर राज ठाकरेंची सभा उधळून लावणार” 

‘…तर कुणी मानसिक रोगी’; जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला 

मोठी बातमी! शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्यावर बलात्काराचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ 

“तुम्हाला कळत नसेल तर अजित पवारांना विचारा…”; चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना टोला