भावनिक, मानसिक लिंचिंगमुळे सुशांतचा बळी गेला- कंगणा राणावत

मुंबई | सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी मुंबईतील त्याच्या राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्यामुळे सगळं बॉलिवूड हादरलं आहे. अशात कंगणा राणावतने सुशांतचा बळी हा इमोशनल, सायकोलॉजिकल आणि मेन्टल लिंचिंगमुळे गेला, असा आरोप केला आहे.

भावनिक, मानसिक लिंचिंग केलं गेल्याने सुशांत सिंह राजपूत या कलाकाराने आत्महत्येचं पाऊल उचललं असा नवा आरोप आता अभिनेत्री कंगणा राणावतने केला आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर नवा व्हिडीओ पोस्ट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सुशांतसिंग राजपूतच्या हत्येनंतर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. काही गोष्टी मी वाचल्या तर काही मी पाहिल्या आणि ऐकल्या आहेत. बॉलिवूडमध्ये त्याच्यासोबत जे काही घडत होतं त्यामुळे तो त्रस्त झाला होता असं सुशांतच्या वडिलांनी एका मुलाखतीत सांगितल्याचं कंगणाने सांगितलं आहे.

बॉलिवूडच्या मू्व्ही माफियांनी अत्यंत पद्धतशीरपणे सुशांतची बदनामी केली. त्याचं नाव न घेता त्याला अप्रत्यक्षपणे वाळीत टाकण्याचे प्रकार सुरु केले. ज्यामुळे हळूहळू सुशांत नैराश्याच्या गर्तेत ढकलला गेला, असं कंगणाने सांगितलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-जर जमीन चीनची होती, तर आपल्या जवानांना का मारण्यात आलं?- राहुल गांधी

-“पंतप्रधानपद सोडा… पुढच्यावेळी शिवसेनेने मुंबईत महापौर तरी बसवून दाखवावा”

-आम्ही मजबूर नाही तर मजबूत आहोत, महाराष्ट्र जवानांच्या पाठीशी- उद्धव ठाकरे

-‘तो’ रस्ता भारतासाठी महत्त्वाचा; शरद पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सल्ला

-राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर; मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे विजयी