ज्येष्ठ पत्रकार मंगला विंचुर्णे-बर्दापूरकर काळाच्या पडद्याआड

औरंगाबाद | ज्येष्ठ पत्रकार मंगला विंचुर्णे-बर्दापूरकर यांचे दीर्घ आजाराने वयाच्या 66व्या वर्षी निधन झाले. मुळच्या नागपूरच्या असलेल्या मंगला विंचुर्णे-बर्दापूरकर 1980 आणि 90 या दोन दशकातील मराठीतील अग्रगण्य महिला पत्रकार होत्या. गेल्या पांच वर्षांपासून त्या औरंगाबादला स्थायिक होत्या.

नागपूर पत्रिका या दैनिकाच्या रविवार पुरवणी आणि याच दैनिकाच्या महाराष्ट्र आवृत्तीचे संपादकपद त्यानी सांभाळले होते 1983 ते 1990 या काळात ‘लोकसत्ता’च्या नागपूर येथील वार्ताहर म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे .

मंगला विंचुर्णे-बर्दापूरकर यांनी विविध वृत्तपत्रे , नियतकालिके आणि आकाशवाणीसाठी विपुल लेखन केलेलं आहे. गेल्या चार वर्षापासून त्या पक्षाघात आणि असाध्य पार्किन्सनने आजारी होत्या. मंगला विंचुर्णे-बर्दापूरकर यांच्या पश्चात पती , ज्येष्ठ संपादक प्रवीण बर्दापूरकर, विवाहित कन्या सायली, जावई दीपक ग्यानानी, भाऊ श्रीकांत आणि खूप मोठा आप्त व मित्र परिवार आहे.

मंगला बर्दापूरकर यांच्या पार्थिवावर उद्या, ७ मार्चला सकाळी ९ वाजता प्रतापनगर स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

महत्वाच्या बातम्या- 

-एकतर हे माध्यम सोडून द्यावं नाहीतर….; जितेंद्र जोशींना संताप अनावर

-उद्धव ठाकरेंसोबत काँग्रेस नेतेही पोहोचले आयोध्येत

-पोरीनं आई-बापाचं पांग फेडलं; पहिल्याच प्रयत्नात बनली पीएसआय!

-सरकाचा अर्थसंकल्प महिला वर्गाला पूर्णपणे निराशा करणारा; चित्रा वाघ यांची टीका

-राहुल गांधींनी कोरोनाची तपासणी केली; काँग्रेसचं भाजपला उत्तर