“मैं करू तो साला, कॅरेक्टर ढीला है”, अमृता फडणवीसांचा खोचक टोला

मुंबई | मागील काही दिवसांपासून राज्यातील वातावरण तापलेलं आहे. राज ठाकरे यांचं भोंगा प्रकरण, हनुमान चालिसा प्रकरण, राणा दाम्पत्यांचं आंदोलन आणि काल भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला, या सर्व प्रकरणामुळे आता राजकीय वर्तुळात असंतोषाचं वातावरण आहे.

किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाल्यानंतर भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्याचा जाहीर निषेध केला आहे. अशातच आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी गायिका अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

बाळासाहेब के नाम पे करते सभी अब रास लीला है, मैं करूँ तो साला, कॅरेक्टर ढीला है, असं ट्विट अमृता फडणवीसांनी केलं आहे. अमृता फडणवीस यांनी शनिवारी रात्री केलेलं एक ट्वीट करून पुन्हा डिलीट केलं. त्यानंतर ट्विटर चर्चा सुरू होती.

डिलीट केलेल्या ट्विटमध्ये ‘उध्वस्त ठरकीने कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र?’, असा सवाल अमृता फडणवीस यांनी विचारला होता. #Maharashtraunderattack असा टॅग देखील त्यांनी वापरला होता.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आदेशाने पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी करायला लावल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. त्यानंतर आता मोठा वाद पेटल्याचं पहायला मिळतंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! राणा दाम्पत्याला न्यायालयाचा दणका

“आता तांडव होणार, किती गुन्हे दाखल करायचे ते करा” 

“महाराष्ट्रात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झालीये” 

“दगड जरा वरती लागला असता तर मी कायमचा आंधळा झालो असतो”  

मोठी बातमी! किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप