सांगली | राष्ट्रवादीने 50 आमदारांचा आकडा पूर्ण केल्यावर आम्हाला सोबत घेतल्याशिवाय कोणीही सरकार स्थापन करु शकणार नव्हतं. त्याप्रमाणेच झालं. 2024 मध्ये राष्ट्रवादी हा राज्यातील एक नंबरचा पक्ष होईल, असा प्रयत्न करू, असं भाकित राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे.
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे बोलत होते. मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच इस्लामपूरमध्ये आलेल्या जयंत पाटील यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. तसेच जंगी मिरवणुकही काढण्यात आली.
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणुकीनंतर इतकं मोठ राजकारण घडलं आहे. टीव्ही लावला की जनतेला सकाळी एक, दुपारी दुसरं आणि रात्री तिसरंच राजकारण बघायला मिळालं. पण जनतेचं मत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचं आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी एकत्र येण्याचं होतं. त्यामुळे तशा राजकीय घडामोडी घडल्या, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
सत्ता आल्यावर लगेच दुसऱ्याच दिवशी कर्जमाफी बाबत विचारणा होते आहे. मात्र या बाबत थोडा वेळ द्यावा लागेल. राज्याची तिजोरी स्थिती बघावी लागणार आहे, मात्र थोड्या दिवसात आम्ही योग्य निर्णय घेणारच आहोत, असंही जयंत पाटलांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत; भाजपकडून खासदारांसाठी व्हिप जारी – https://t.co/gkYqkkSt6B @AmitShah @BJP4India
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 9, 2019
“मोदी-शाह यांनी ‘ते’ करुन दाखवण्याचं धाडस दाखवावं” – https://t.co/QefuQJyUAe @OfficeofUT @AmitShah @narendramodi @ShivSena @BJP4India
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 9, 2019
सत्तास्थापनेच्या नाट्यमय घडामोडीनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकत्र! – https://t.co/C8C8jUvDIS @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @NCPspeaks @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 9, 2019