मुंबई | नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या मुद्द्यावरुन दिल्लीत हिंसाचार उसळला आहे. अशातच दिल्ली पोलिसांना खडेबोल सुनावणारे न्यायमूर्ती मुरलीधर यांची बदली करण्यात आली आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर टीका केली आहे.
‘भाजप नेत्यांच्या भडकाऊ भाषणावर कारवाई का केली नाही’ असा दिल्ली पोलिसांना प्रश्न विचारणारे दिल्ली हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश मुरलीधर यांना त्यांच्या कर्तव्याचे बक्षीस म्हणून त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. ही दडपशाही बघून हिटलरने सुद्धा शरमेने मान खाली घातली असती, असं म्हणत आव्हाडांनी टीका केली आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.
बुधवारी न्यायमूर्ती मुरलीधर यांनी दिल्ली हिंसाचार सुनावणी प्रकरणात भाजप नेते कपिल मिश्रा, अनुराग ठाकूर, प्रवेश वर्मा यांच्यावर अजून एफआयआर का दाखल नाही, असं विचारत पोलिसांवर कडक ताशेरे ओढले होते. त्यांनतर त्यांची एका दिवसात बदली करण्यात आली आहे.
दरम्यान, न्या. मुरलीधर यांच्या बदलीमुळे राजकारण पेटण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरुन भाजपवर टीका करणे सुरु केले आहे.
Justice Muralidhar of Delhi Highcourt is transferred to Punjab
.
He was the one who commented on Delhi Riots and came down heavily on the inaction by the govt .
.
The result was … #transfer
.
Should judiciary be silent spectators…— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 27, 2020
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांसाठी खुषखबर! आता करता येणार अवघ्या 10 रूपयात दिवसभर पीएमपीचा प्रवास
-“स्वातंत्र्य चळवळीत भाजप किंवा तेव्हाच्या ‘संघ’ परिवाराचे योगदान काय?”
-“दिल्ली पेटण्याला फक्त वारिस पठाण कारणीभूत आहेत”
-विनोद तावडेंची शिक्षणमंत्र्यांवर कडवट टीका म्हणतात…
-बाळासाहेबांचा पुत्र म्हणून मुख्यमंत्री या नात्याने मराठी भाषेचं विधेयक मंजूर होतय हे माझं भाग्यच”