मुंबई | राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे, त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही उदयनराजेंना लक्ष्य केलं आहे.
शरद पवारांनी उदयनराजेंच्या बालीश चाळ्यांना पाठिशी घातलं, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.
“साहेब, उदयनराजेंवर तुम्ही मानापासून प्रेम केलं. सातारातल्या आपल्या जवळच्यांना दुखावलंत. त्यांच्या सगळ्या आचरट बालिश चाळयांना पाठिशी घातलं पोटच्या पोरावाणी प्रेम केलेत. खरा तर तुमचा स्वभाव तसा नाही. साहेब काय मिळाले? पण तरीही “यशवंतरावांचा सातारा जिल्हा
शरद पवारांचा बालेकिल्ला”, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, उदयनराजेंनी भाजपाध्यक्ष अमित शहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लवकरच ते महाजनादेश यात्रेत दिसणार आहेत.
https://twitter.com/Awhadspeaks/status/1172724032950521856?s=19
महत्वाच्या बातम्या-
हो, माझी जीभ घसरली; ‘त्या’ वक्तव्याबद्दल पियूष गोयल यांचा माफीनामा- https://t.co/hH9wPK3xOi #म
— mk (@MahaKesariNews) September 14, 2019
पक्ष प्रवेशाआधी उदयनराजेंचा रात्री सव्वा एक वाजता राजीनामा – https://t.co/Tvtp19vyKo @Chh_Udayanraje
— mk (@MahaKesariNews) September 14, 2019