नवी दिल्ली | काश्मीर आमचा होता, आमचा आहे आणि आमचाच राहिल. भारताच्या बाजूने आम्ही आहोत. त्यामुळे काश्मीर हा आमचा अंतर्गत विषय असून काश्मिरी लोकांच्या समस्या दूर करण्याची जबाबदारी स्थानिक नेत्यांची आहे, असं उलमा ए हिंदने पाकिस्तानला ठणकावून सांगितलं आहे.
काश्मीरप्रश्नी पाकिस्तान खोटं पसरवण्याचा उद्योग करीत असल्याचे उलमा-ए-हिंदचे पदाधिकारी महमूद मदनी यांनी म्हटले आहे.
काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानकडून भारतीय मुस्लिमांना डिवचण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र उलमा ए हिंदने हा प्रयत्न हाणून पाडला आहे.
आम्हाला विश्वास आहे की, काश्मीर खोऱ्यातील स्थिती सामान्य होण्याकरीता सरकार आवश्यक पावले उचलत आहे. आम्ही काश्मीर मुद्द्यावर भारताच्या सोबत आहोत, असं उलमा ए हिंदने म्हटलं आहे.
जे काश्मिरी लोक आपली सांस्कृतीक ओळख सुरक्षित ठेऊ इच्छितात… सरकारने त्यांचा आवाजही ऐकायला हवा, असं मत महमूद मदनी यांनी व्यक्त केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
उदयनराजेंचं ठरलं! शरद पवारांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी पुन्हा? – https://t.co/qudtEe0T82 @Chh_Udayanraje @dhananjay_munde @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 12, 2019
हर्षवर्धन पाटील यांचे पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांच्याबद्दल मोठे खुलासे! https://t.co/Y5CXuUwrV1 @Harshvardhanji @AshokChavanINC @prithvrj
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 12, 2019
अजित पवारांचं माझ्यावर फारच प्रेम आहे- हर्षवर्धन पाटील https://t.co/JlMo04wtp9 @Harshvardhanji @AjitPawarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 12, 2019