“शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंना लाज वाटायला हवी”

मुंबई | माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. समीर वानखेडे प्रकरण हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची ट्रिक आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे, अशी टीका किरीट सोमय्यांनी केली आहे.

गेली 12 दिवस झाले समीर वानखेडे दलित की मुस्लिम हा वाद सुरु आहे. अजित पवारांवर 11 दिवस धाडी सुरु होत्या. त्यांना वाचवण्यासाठीच हे प्रकरण सुरु करण्यात आलं. ही सगळी ठाकरे सरकारची बदमाशी सुरु आहे, असं सोमय्या म्हणाले.

शरद पवार यांनी स्पष्ट केलं की अजित पवारांकडे चिल्लर सापडली. पण बिल्डरकडे 180 कोटी सापडले, त्याच बिल्डरने अजित पवारांना 100 कोटी रुपये दिले आहेत. अजित पवारांचे घोटाळे सिद्ध झाले आहेत. अजित पवार सिंचन घोटाळ्यात आरोपी आहेत. चार्जशीटमध्ये त्यांचं नाव आहे. त्यावरील कारवाई या सरकारने थांबवली आहे, असं सोमय्यांनी म्हटलंय.

सिंचन घोटाळ्याची चर्चा, स्वतःचे घोटाळे दाबण्यासाठी लक्ष विचलीत करण्याचं काम सुरु आहे. त्यात जर काही घोटाळा असेल तर मग कारवाई करा. नारायण राणेंचा बंगला अनधिकृत असल्याचं सांगता मग तुम्ही कारवाई का करत नाही. संजय राऊत यांचं पत्र मी रद्दीत टाकलं आहे, असं किरीट सोमय्यांनी म्हटलंय.

मी त्या पत्राला दमडीचीही किंमत देत नाही. 31 डिसेंबरपर्यंत अलीबाबा आणि चाळीस चोरांचे घोटाळे काढणार. उद्धव ठाकरे यांनी कितीही ट्रिक काढल्या तरी घोटाळेबाज सुटणार नाहीत, असा इशाराही सोमय्या यांनी यावेळी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

पेट्रोल-डिझेलचा दर वाढला, पाहा काय आहे आजचा दर

काय सांगता ! चक्क अस्वल करतोय ब्रेक डान्स, पाहा मजेशीर व्हिडीओ

देवेंद्र फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अध:पतन बघवत नाही- संजय राऊत

गांजा ओढणाऱ्या बाबांनाही तुरूंगात टाका- रामदास आठवले

धक्कादायक! स्टेजवर बोलत असतानाच काँग्रेस नेत्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू