कोल्हापुरात मुसळधार पाऊस, पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर

कोल्हापूर | जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुराचे संकट कायम आहे.

गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी 40 बंधाऱ्यावर नदीचे पाणी येवून 60हून अधिक थेट संपर्क तुटला असून या गावांना पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.

धरणाच्या क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने सर्वच धरणातून मोठया प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे. पंचगंगा नंदीची पाणी पातळी देखील मोठ्या प्रमाणात वाढली असून पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे.

येत्या दोन दिवसात कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशारानंतर पूरग्रस्त भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, या सगळ्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-