पुणे | विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी समोरील अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. एकीकडे मोठ्या प्रमाणावर आऊटगोईंग चालू असताना पक्षात बंडखोरांनी देखील डोकं वर काढायला सुरूवात केली आहे.
माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल शिवसेनेकडून उमेदवारी मिळवून वळसे पाटलांच्या विरोधात उभे ठाकण्याच्या तयारीत आहेत.
आंबेगावमधल्या जारकरवाडीत शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकासकामांना बांदल यांनी हजेरी लावली. आणि आंबेगावच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली.
बांदल यांनी या कार्यक्रमात शिवाजीराव आढळराव पाटील यांचं तोंडभरून कौतुक केलं. त्यामुळे वळसे पाटलांच्या विरोधात शिवसेनेचा उमेदवार ठरला, अशी उपस्थितांमध्ये एकच चर्चा होती.
दरम्यान, पक्षातील आऊटगोईंग थांबवण्याचं राष्ट्रवादीसमोर मोठं आव्हान आहेच आहे मात्र आता ‘बंडोबांना थंडोबा’ करण्याचंही आव्हान राष्ट्रवादीसमोर आहे.
महत्वाच्या बातम्या-
“विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षाचा ढोल वाजणार नाही तर फुटणार” – https://t.co/VOw0xGorDM @girishdmahajan
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 12, 2019
….म्हणून उदयनराजे ‘शिवस्वराज्य’ यात्रेला आले नाहीत- धनंजय मुंडे https://t.co/3r476nDpGk @dhananjay_munde @Chh_udyanraje @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 12, 2019
“काश्मिर भारताचा होता अन् इथून पुढेही भारताचाच राहिल…” https://t.co/sAHXrDatvf #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 12, 2019