“15 कोटी मुसलमान जर तुमच्या विचारांचे असते तर तुमच्यावर माजी आमदार होण्याची वेळ आली नसती”

मुंबई | गुलबर्ग्यातल्या CAA विरोधी मोर्चात आम्ही 15 कोटी आहोत मात्र 100 कोटींना भारी आहोत हे लक्षात ठेवा, असं वादग्रस्त वक्तव्य एमआयएम नेते वारिस पठाण यांनी केलं होतं. यावरुन राजकीय वातावरण तापलं असून वारिस पठाण यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी वारीस पठाण यांच्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

देशातील १५ कोटी मुस्लिम वारीस पठाण यांच्या विचारांचे असते तर त्यांच्यावर माजी आमदार होण्याची वेळ आली नसती, असा बोचरा वार मेहबूब शेख यांनी वारीस पठाण यांच्यावर केला आहे. आरएसएसच्या सांगण्यावरून हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा एमआयएम पक्ष प्रयत्न करतोय, हे मुस्लिम समाज चांगलं जाणून आहे, असं ते म्हणाले.

शाहीनबागेमध्ये मुस्लिम समाजाच्या संगतीला हिंदू समाज देखील मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर बसलेला आहे. येत्या काळात निवडणुका असल्याने अशा प्रकारे तुम्ही वक्तव्य करत असाल. देवेंद्र फडणवीस आणि अर्णब गोस्वामी तुमच्या कार्यक्रमाला आले होते त्याचवेळी तुमचं हे ठरलेलं दिसतंय. तुमची ही वक्तव्य मुस्लिम समाज चांगल्या प्रकारे जाणून आहे, असं शेख म्हणाले.

वारीस पठाण यांनी लक्षात ठेवावं, त्यांच्या वक्तव्यांनी मुस्लिम समाजात कुठलाही फरक पडणार नाही. वारीस पठाण यांनी स्वत:चं आत्मपरीक्षण करावं. मग त्यांच्या लक्षात येईल की आपल्या पाठीमागे जर 15 कोटी मुसलमान असते तर आपल्यावर माजी आमदार होण्याची वेळ आली नसती, असं ते म्हणाले.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-बाळासाहेब असते तर ते काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर गेले असते का?? सुभाष देसाईंचं लक्षवेधी उत्तर

-ठाकरे सरकारचा रिमोट कंट्रोल तुमच्या हातात आहे काय? शरद पवार म्हणतात…

-राधाकृष्ण विखे लवकरच महाविकास आघाडीत; राष्ट्रवादीच्या या बड्या मंत्र्याचा दावा

-जाने कहाँ गये वो दिन… बरोबर 2 वर्षांपूर्वी पुण्यात रंगली होती राज ठाकरे-शरद पवार मुलाखत!

-उद्धव ठाकरेंच्या’ दिल्लीवारी’वर मनसेची बोचरी टीका; म्हणाले ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’!