हॉटेल रेनिसान्समधून महाराष्ट्राचं सरकार बनवणारच; राष्ट्रवादीला विश्वास

मुंबई | शनिवारी घडलेल्या भूकंपानंतर राष्ट्रवादीने आपले आमदार फुटू नयेत म्हणून खबरदारी घेतलेली आहे. आपल्या आमदारांना त्यांनी मुंबईतल्या पवईच्या हॉटेल रेनिसान्स येथे ठेवलं आहे. त्याच रेनिसान्स हॉटेलमधून आम्ही आगामी महाराष्ट्राचं सरकार बनवू, असा विश्वास राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

ज्या रेनिसान्स हॉटेलमधून भाजपने कर्नाटकचं सरकार पाडलं होतं त्याच रेनिसान्स हॉटेलमधून आम्ही महाराष्ट्राचं सरकार बनवणार आहोत हा योगायोग आहे, असं ट्टीट नवाब मलिक यांनी केलं आहे.

राष्ट्रवादीचे कोणतेही आमदार फुटणार नाहीत. विश्वासदर्शक ठरावात आम्ही नक्कीच भाजपला पराभूत करू, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि आमदार नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

जे आमदार काल आऊट ऑफ कव्हरेज ते आमदार आज आम्हाला संपर्क करून आम्ही पवारसाहेबांसोबत असल्याचं सांगत आहेत, असं नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. दरम्यान, महाराष्ट्र सत्तास्थापनेच्यासंबंधी सगळ्या देशाचं ज्या सुप्रिम कोर्टाकडे लक्ष लागलं होतं त्या सुप्रिम कोर्टाने आजचा निर्णय उद्यावर ढकलला आहे. महाराष्ट्रातल्या सत्तापेचावर उद्या पुन्हा सकाळी साडे दहा वाजता सुनावणी होणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-