जालना : येत्या 31 ऑगस्टला राष्ट्रवादीचे 4 आमदार मला भेटायला येणार आहेत. त्याशिवाय इतर 17 आमदार भाजपमध्ये येण्यासाठी रांगेत उभे असल्याचा गौप्यस्फोट केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. जालन्यात एका पत्रकार परिषदेदरम्यान दानवेंनी हे वक्तव्य केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार सत्ताधारी पक्षात प्रवेश केला आहे. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेतनेत्यांचे पक्षप्रवेश सुरु आहेत.
विरोधी पक्षातील आणखी 17 आमदार भाजपात येण्यासाठी रांगेत उभे असल्याचे वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे 4 आमदार माझ्या संपर्कात आहे. ते सर्व आमदार शुक्रवारी 31 ऑगस्टला मला भेटायला येणार असल्याचे वक्तव्यही दानवेंनी केलं आहे.”
लोकसभा निवडणुकांप्रमाणेच विधानसभेतही भाजप-शिवसेना युती कायम राहील. येत्या विधानसभा निवडणुका आम्ही एकत्रच लढणार आहोत, असेही दानवेंनी यावेळी सांगितले.
महत्वाच्या बातम्या-
उपमुख्यमंत्रीपदाबाबत आदित्य ठाकरे म्हणतात…https://t.co/WafDq1KmBS @AUThackeray @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 27, 2019
40 वर्षे ज्यांच्यासोबत काम केलं त्यांनी पक्ष सोडल्यावर दु:ख तर होणारच; सुप्रिया सुळे भावूक – https://t.co/KZYBk4QUXb @supriya_sule
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 27, 2019
येडीयुरप्पांनी खेळलं ‘जातीचं कार्ड’; आता मंत्रिमंडळात असणार 3 उपमुख्यमंत्री – https://t.co/jbYcUYUjB9 @BSYBJP
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 27, 2019