नागपूर | आमच्या जातीला आरक्षण नाही तेच बरं आहे अन्यथा मी कुठेतरी बाबू झालो असतो. मी घरच्यांना आधीच सांगितलं होतं… मला नोकरी करणारा नाही तर नोकरी देणारा व्हायचं आहे, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. नागपुरात अखिल माळी समाजाच्या महाअधिवेशनाला नितीन गडकरी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात गडकरी बोलत होते.
मी सगळ्याच समाजांच्या कार्यक्रमात जातो. प्रत्येक समाजाकडून मागणी केली जाते की आम्हाला राजकारणात जागा मिळाली पाहिजे. मंत्रीपद आमच्या समाजाला मिळालं पाहिजे. मात्र विशिष्ट समाजातला माणूस मंत्री झाला की त्याच्या हातून विकास होईलच असं काही नसतं नाही. त्याला सगळ्यांचाच विचार करावा लागतो, असंही गडकरी यावेळी म्हणाले.
आम्ही असे नेते तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे जे देशाला विकासाचं लक्ष्य गाठून देतील. राज्याच्या विकासासाठी काम करतील, असं ते म्हणाले.
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न जाहीर करावा, अशी मागणी माळी समाजाने केली आहे. तो त्यांना मिळावा यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही गडकरी यांनी यावेळी दिली.
जे लोक कर्तृत्त्वाने हरतात ते तिकिट मागण्यासाठी जातीचा आधार घेतात, असा टोला गडकरींनी यावेळी लगावला.
महत्वाच्या बातम्या-
‘तो’ निर्णय अजित पवारांचा… पक्षाचा नाही- शरद पवार https://t.co/D63RcwgcEx @PawarSpeaks @AjitPawarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 16, 2019
राजू शेट्टींनी चंद्रकांत पाटलांना दिलं हे आव्हान; चंद्रकांत पाटील स्विकारणार का?? https://t.co/kkzzBglza3 @rajushetti @ChDadaPatil
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 16, 2019
जलीलांच्या वक्तव्याने एमआयएम आणि वंचितमध्ये पुन्हा नवं ट्वीस्ट! https://t.co/BSu9OJIat3 @imtiaz_jaleel @Prksh_Ambedkar
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 16, 2019