देवेंद्र फडणवीस-अजित पवारांच्या ‘त्या’ शपथविधीवर नितीन गडकरींची बॅटींग!

मुंबई |  भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या साथीने भल्या पहाटे मुख्यमंत्रिपदाची घेतलेली शपथ सगळ्या देशाने पाहिली. अनेकांना तर ही गोष्ट काही वेळ खरीदेखील वाटत नव्हती. या सगळ्यांना आता 3 महिने उलटून गेले आहेत. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सरकार स्थापन केलं आहे. बेधडक आणि कुणाचीही भीड-भाड मनात न ठेवता बोलणारे नेते केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी फडणवीस- अजित पवारांच्या त्या शपथविधीवर भाष्य केलं आहे. शनिवारी ‘एबीपी माझा’च्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ या कार्यक्रमात गडकरी बोलत होते.

जे एकमेकांना बोलत नव्हते, एकमेकांना साधा नमस्कार देखील करत नव्हते ते आता एकत्रित आले आहेत, असं म्हणत त्यांनी शिवसेनेला जोरात चिमटा काढला. तर अजित पवारांनी फडणवीसांसोबत घेतलेली शपथ समजू शकतो. अजित पवारांनी पहाटेला शपथ घेताना केलेला विचार देखील समजू शकतो. परंतू अजित पवार राष्ट्रवादी सोडून भाजपबरोबर आले होते. त्यामुळे ‘परिवर्तन’ होतं, असं विश्लेषण त्यांनी फडणवीस-अजित पवारांच्या शपथविधीचं केलं.

फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर शिवसेना कोणत्या विचारातून प्रेरित होऊन गेली असं म्हणत माझा विचार, माझी संघटना मी कधी सोडणार नाही… मी विहिरीत जीव देईन पण कधी काँग्रेसमध्ये जाणार नाही, असा ठाम विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

काँग्रेस राष्ट्रवादीचा नेमका कोणता विचार शिवसेनेला पटला, याचा एकही धागा मला समजला नाही, असं गडकरी म्हणाले. नायदर रायटिस्ट नॉर लेफिस्ट वुई आर अ‌ॅपोरचुनिस्ट, असं म्हणत त्यांनी शिवसेनेला टोला लगावला. तर या देशात मतभिन्नता हा विषय नाहीये. मतभिन्नता हा विषय असला पाहिजे पण मनभिन्नता नको पण मतभिन्नतेपेक्षा विचार शून्यता ही मोठी समस्या आहे, असंही गडकरी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-विहिरीत जीव देईन पण कधी काँग्रेसमध्ये जाणार नाही- नितीन गडकरी

-शेवटचे भाग पाहून ढसाढसा रडलेल्या चिमुरड्या शंभुराजांची डॉ. अमोल कोल्हेंनी घेतली भेट

-देवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक- शिवाजी आढळराव पाटील

-“मोदींनी पाठ थोपाटून विचारलं काय मंत्रीजी कसं काय चाललंय??”

-“कुणाच्या सांगण्यावरून मालिकेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही”