नालायक पाकिस्तान!; भारत-चीन वादाचा फायदा घेत अशाप्रकारे करतोय कुरापती!

नवी दिल्ली | गलवान खोऱ्यातील घटनेनंतर भारत-चीन सीमावाद हा चांगलाच चिघळला आहे. सहाजिकच भारतीय लष्कराचं मुख्य लक्ष लडाखकडे लागून आहे. याच संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न पाकिस्तान मधील दहशतवादी संघटनांकडून केला जात आहे.

लष्कर ए तोयबाचे अतिरेकी भारतात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. भारत सीमेपालिकडे अश्या 50 ते 60 दहशतवाद्यांच्या हालचाली भारतीय गुप्तचरांनी टिपल्या आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी तळ उभारल्याचे ही आढळून आले आहे.

भारत सीमेपलीकडील अनेक भागांत दहशतवादी हालचाली घडत आहेत. बरीच दहशतवादी टोळकी पाकव्याप्त काश्मीरसोबत इतर भागातून पुढे सरकत आहेत. अनेक गुप्तचर यंत्रणांनी दहशतवादी संघटनांच्या हालचाली टिपत ही माहिती संकलित केली आहे.

या माहितीमुळे भारतात दहशतवादी घुसवण्याच्या पाकिस्तानच्या कटावर प्रकाशझोत पडला आहे. दरम्यान, पाकिस्तान दहशतवाद्यांना मदत करत असल्याने अनेक आंतराष्ट्रीय दबाव पाकिस्तानवर टाकण्यात आले होते. मात्र, तरीही पाकिस्तान दहशतवाद्यांना मदत करत असल्याचं सिद्ध झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

क्वारंटाईन सेंटरमध्ये भरती केलं होतं तरुणाला; त्यानं उचललेल्या पावलानं प्रशासन हादरलं!

“साहेब मंदिर बांधून कोरोना जाणार नाही, तर पावसात भिजूनही पंतप्रधान होता येणार नाही”

धक्कादायक! मोठ्या भावाने समोसा खाल्ला म्हणून लहान भावाने उचलले ‘हे’ पाऊल

तैमूर आणि करिनासोबत फिरताना सैफनं घातला नाही मास्क; ट्रोल झाल्यावर दिलं ‘हे’ कारण

महाविकास आघाडी सरकारला सुरुंग लावण्याचे प्रयत्न; ‘या’ महिन्यात होणार सत्तापालट?