सोशल डिस्टसिंग ठेवणं हाच कोरोनाला रोखण्याचा अंतिम मार्ग- पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली |  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज दुसऱ्यांदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना संबोधित करत आहेत. जनता कर्फ्यूला सगळ्या देशवासियांनी सफल केलं. त्यांच्या उस्फूर्त सहभागाने जनता कर्फ्यू यशस्वी झाला. तसंच देशावर संकट आल्यावर सगळे एकत्र येतात, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.

सोशल डिस्टसिंग ठेवणं हाच कोरोनाला रोखण्याचा अंतिम मार्ग आहे. या रोगाला हरवण्याचा विलगीकरण हाच एकमेव उपाय आहे. सामान्यांपासून पंतप्रधालादेखील हाच उपाय असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं.

काही लोकांचा निष्काळजीपणा हा घातक ठरेल. याची खूप मोठी किंंमत भारताला चुकवावी लागेल, असा इशारा मोदींनी यावेळी दिला. तसंच सर्व प्रगत देशांमध्ये आव्हान वाढत चाललं आहे. त्यामुळे आपण सतर्कता बाळगायला हवी, असं ते म्हणाले.

दरम्यान, संपूर्ण देशामध्ये आज रात्री 12 वाजल्यापासून लॉकडाऊनचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. एकप्रकारे हा कर्फ्यूच असणार आहे, असंही त्यांनी सांगितलं,

महत्वाच्या बातम्या – 

-पुणेकरांनो पेट्रोल-डिझेल भरायला जात असाल तर जरा थांबा…! फक्त ‘यांनाच’ मिळणार पेट्रोल-डिझेल

-“मी काहीही बंद केलं आहे असं सांगायला नाही तर राज्यातील जनतेला धन्यवाद द्यायला आलोय”

-“सध्या जगभरात, देशात कोरोना विषाणूचं संकट उभं असताना गुढीपाडव्याची खरेदी करायला घराबाहेर पडू नका”

-‘गो करोनिया गो’…. पाहा विनोदवीर कुशल बद्रिकेचं भन्नाट गाणं

-कोरोनानंतर चीनमध्ये आला हंता विषाणू; एकाचा मृत्यू, 32 जणांची चाचणी