“राऊतांनी उद्धव ठाकरेंचा निकाल लावला आता ते शिवसेनेचा लावणार”

मुंबई | शिवसेनेत बंड झाल्याने महाविकास आघाडी सरकार (MVA) पडले. महाविकास आघाडी सरकार पाडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षावर आणि त्यांच्या अधिकृत निवडणूक चिन्हावर देखील दावा सांगितला.

त्यामुळे शिवसेना पक्षाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत कधी नव्हे ते एवढ्या मोठ्या बंडाला सामोरे जावे लागत आहे. शिवसेनेतील हे काही पहिले बंड नाही. यापूर्वी नारायण राणे (Narayan Rane), छगन भुजबळ (Chagan Bhujbal) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या रुपात शिवसेनेचा बंडाचा इतिहास आहे. परंतु आताचे बंड काही वेगळेच आहे.

भाजपचे नेेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी आता या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी या बंडाला संजय राऊत यांना जबाबदार धरले आहे. संजय राऊतांच्या वाणीने शिवसेना दुभंगली, अशा स्वरुपाचा त्यांनी आरोप केला आहे.

शिवसेना आदेशावर चालणारा पक्ष असला, तरी संजय राऊत याला अपवाद आहेत. त्यांचे आदेश सिल्वर ओक (Silver Oak) मधून येतात. त्यांचे हायकमांड सिल्वर ओक आहे. त्यांच्या बोलण्याने आमदार दुखावले आणि आता ते भाजपात सामिल झाले.

संजय राऊतांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निकाल लावला आता ते शिवसेना पक्षाचा लावणार आहेत, असा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. तसेच त्यांनी भाजपच्या मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केले.

विखे पाटील म्हणाले, यांना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काही देणेघेणे नाही. केवळ सत्ता गेल्याच्या वैफल्यातून विरोधक आपल्यावर टीका करीत आहे. आता राज्यातील सरकार हे जनतेला अपेक्षित सरकार आहे. त्यामुळे जनता खूश आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. खरे शिवसैनिक त्यांच्याबरोबर असून ते तत्वाशी तडजोड करणार नाहीत. आणि राऊतांचे हायकमांड सिल्वर ओक असल्याने ते हिंदूत्वापासून दुरावले आहेत. त्यामुळे त्यांचे लोक त्यांच्यापासून दुर गेले आहेत, असे विखे पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

“बाळासाहेबांच्या पोटी आलात म्हणजे काही राजा झालात का?” 

‘उद्धव ठाकरे दोन वेळा घरातून पळून गेले होते’, नारायण राणेंचा गौप्यस्फोट

“काय ते प्रश्न.. काय ती उत्तरं.. काय तो घरगुती कार्यक्रम.. एकदम ओक्के”

“उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्व भाजपमुळेच आहे”

“तुमच्यात कर्तृत्व नाहीये, तुम्ही मर्द नाहीत, शिवसेनेच्या बापाचा फोटो लावून भीक मागू नका”