ठाणे | सरकारला उत्पन्नच मिळवायचे असेल तर त्यांनी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्यावेत, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फडणवीस सरकारने घेतलेल्या गडकिल्ल्यासंदर्भातील निर्णयावर हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्राला भूगोल आणि इतिहास आहे. मात्र सरकारला याचं काहीच देणंघेणं नाही. जर सरकारला उत्पन्न हवे असेल, तर त्यांनी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्यावेत. त्यातून त्यांनी पैसे मिळवावेत, असं राज म्हणाले.
या सरकारला शिवप्रेमींच्या भावनाची काही कदर नाही. भाजप मशीनच्या मदतीने निवडून येत आहे. त्यामुळे ते लोकांना विचारातही घेत नाहीत, असं टीकास्त्र त्यांनी यावेळी सोडलं.
दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील सरकारला उत्पन्नच पाहिजे असेल तर वर्षा बंगला भाड्याने द्यावा, अशी बोचरी टीका केली होती.
महत्वाच्या बातम्या-
“सत्ता बदलली की उडी…. घरावर संकट आलं म्हणून पळून जायचं का??” https://t.co/yMo7LDQNiB @bb_thorat @RVikhePatil
— थोडक्यात (@thodkyaat) September 7, 2019
आता चप्पल किंवा सँडल घालून बाईक चालवल्यास भरावा लागणार दंड? https://t.co/BJp1F296X5 #TrafficRules
— थोडक्यात (@thodkyaat) September 7, 2019
“नागरिकांची फसवणूक करणा-या बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करणार” https://t.co/utc2rsYgKq @MLAMaheshLandge
— थोडक्यात (@thodkyaat) September 7, 2019