मुंबई | निवडणुकीनंतर कोण कुणाकडे गेलं, कुणी सत्ता स्थापन केली हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. महाराष्ट्रात जे काही राजकारण झालं तो महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. आता महाविकासआघाडीचा प्रयोग राज्यभर होणार की कुठं हे बघू. आधी त्यांचा हनिमून पिरीयड संपू द्या, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला आहे.
निवडणुकीसाठी ज्या नेत्यांनी पक्षांतर केलं त्यांना जनतेनं पाडलं. निवडणुकीच्या काळात ही खूप चांगली गोष्ट दिसली. मात्र त्यानंतरही या लोकांनी सत्तेसाठी प्रतारणा करावी हे वाईट आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. याचा परिणाम पुढील निवडणुकीच्या मतदानावरही होऊ शकतो, असं मतही राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.
दरम्यान, 24 तारखेच्या निकालानंतर शरद पवारांच्या सभेची सर्वाधिक चर्चा झाली. या काळात कोण चाणक्य झालं, कोण योद्धे झाले. हे 23 तारखेपर्यंत कोणी म्हणत नव्हतं, असंही राज ठाकरेंनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
आमचा पंतप्रधान, जनतेचा प्रधान नोकर मुका आणि बहिरा- अनुराग कश्यप – https://t.co/o5Z6RLlykQ @anuragkashyap72 @BJP4India
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 21, 2019
“भारतातले तरुण-तरुणीच बेरोजगार आहेत, त्यात बाहेरच्यांना कसं पोसणार” – https://t.co/LGfhE4jEQ3 @RajThackeray @AmitShah @BJP4India
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 21, 2019
अवैध सावकारांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई अटळ- जयंत पाटील – https://t.co/lACdkQTGOX @Jayant_R_Patil @NCPspeaks @nawabmalikncp
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 21, 2019