सोलापूर | सत्तेत सन्मानजनक स्थान मिळत असेल तरच महाविकास आघाडीत सहभागी होऊ, अशी स्पष्ट भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी घेतली आहे. सोलापूर येथे प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.
महाविकास आघाडीतील एक भाग म्हणून स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना कृषीमंत्री करण्यात यावे, अशी मागणी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांनी केलेल्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
राजू शेट्टी यांनी यावेळी बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. संघटनावाढीसाठी आणि संघटनेच्या पूनर्बांधणीसाठी गाव पातळीपासून ते राज्यपातळी पर्यंतच्या सर्वच समित्या बरखास्त करणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे.
दरम्यान, सत्तेसाठी कोणाच्याही दारात कटोरा घेऊन जाणार नाही. महाविकास आघाडीकडून सन्मानजनक स्थान मिळत असेल तरच सत्तेत सहभागी होऊ. तसेच सत्तेत सहभागी झालो तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवत राहणार, असंही ते म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
महाविकासआघाडी सरकारचं खातेवाटप ठरलं! – https://t.co/HiCnjj7blV @BJP4Maharashtra @NCPspeaks @INCMaharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 12, 2019
काहीजण ‘जनपथला’ घाबरुन सभागृहातून पळाले; आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला – https://t.co/1RzvaQZrjG @ShelarAshish @uddhavthackeray @ShivSena @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 12, 2019
“भाजपने दडपशाहीने नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर करवून घेतले” – https://t.co/MjWWXD4zp6 @rautsanjay61 @ShivSena @BJP4India
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 12, 2019