रातोरात स्टार झालेल्या रानू मंडल यांचं झालं होतं दोनदा लग्न

मुंबई : सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर रातोरात एखादी व्यक्ती सेलिब्रिटी झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. याच व्यक्तींच्या यादीमध्ये आता रेल्वे स्टेशनवर गाणं गाणाऱ्या रानू मंडल यांच्या नावाचा समावेश झाला आहे.

रानू मंडल हे त्यातलचं एक उदाहरण आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर गाणं म्हणून उदरनिर्वाह करणाऱ्या रानू मंडल यांच्या सुरेल आवाजाने नेटकऱ्यांची मनं जिंकली आणि त्यांचा व्हिडीओ तुफान लोकप्रिय झाला आहे.

रातोरात स्टार झालेल्या रानू यांना गायक हिमेश रेशमिया याने गाणं म्हणण्याची संधीही दिली. आता यानंतर रानू यांच्याविषयी अनेक गोष्टींचा उलगडा होत आहे. त्यातचं आता त्यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत एक माहिती समोर आली आहे. रानू यांचं दोन वेळा लग्न झाल्याचं समजतंय. 

रानू मंडल यांचं दोन वेळा लग्न झालं असून त्यांचे दोन्ही संसार फार काळ टिकू शकले नाहीत. पश्चिम बंगालमधील एका व्यक्तीसोबत रानू यांचं पहिलं लग्न झालं. लग्नानंतर संसाराला हातभार लागावा म्हणून त्या एका क्लबमध्ये गाणं गात असतं. त्यावेळी केवळ त्या 20 वर्षांच्या होत्या. त्याकाळी त्यांचा आवाज अनेकांच्या पसंतील उतरला होता.  

2000 साली रानू मंडल यांनी पहिल्या पतीने सोडून दिल्यानंतर त्या मुंबईमध्ये आल्या. फिरोज खान या सुपस्टारकडे त्या काम करत होत्या. त्यावेळी त्यांची ओळख बबलू मंडल सोबत होती. बबलूदेखील पश्चिम बंगालमधील होता. या दोघांनी लग्न केलं. मात्र त्यांचा संसार फार काळ टिकू शकला नाही. 2003 मध्ये बबलू यांच निधन झालं.

दरम्यान, 10 वर्ष स्टेशनवर गाणं म्हणत काढणाऱ्या रानू मंडल यांचं आयुष्य़ रातोरात बदललं. अतींद्र चक्रवर्ती या सॉफ्टवेअर इंजिनिअरने रानू यांच्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. 

महत्वाच्या बातम्या :