पराभवामुळे चंद्रकांत खैरे काहीही बरळतात- रावसाहेब दानवे

औरंगाबाद | लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे चंद्रकांत खैरे काहीही बरळत असून आपण कोणती जमीन बळकावली हे खैरे यांनी सिद्ध करावं, असं आवाहन भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी दिलं आहे.

दानवे यांच्यावर खैरे यांनी जमीन बळकावल्याचा आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर दानवे यांनी आपण राजूर संस्थानचे सचिव असल्याने खैरे यांनी आपलं नाव घेऊन आरोप करावेत, असं आवाहन रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. तसेच दानवे यांनी यावेळी नागरिकत्व कायद्याबाबत आपलं मत मांडलं आहे.

नागरिकत्व सुधारीत कायद्यामुळे नाराज भाजपच्या आल्पसंख्यांक आघाडीच्या 22 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याचं मला काहीही माहित नाही. हा कायदा नागरिकत्व देण्याचा असून कोणाचंही नागरिकत्व हिरावून घेण्याचा नाही, असं दानवे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी यावेळी बोलताना महाविकास आघाडीवर देखील टीका केली आहे. हे सरकार फार काळ टीकणार नाही, असा टोलाही रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जे.पी. नड्डा यांची वर्णी!

-पाच वर्षांपूर्वीच शिवसेनेकडून काँग्रेसला सत्तेचा प्रस्ताव, पण…; पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट

-बहीणीच्या भावाला शुभेच्छा, भावाचा टोमणा मारत स्वीकार!

-“आंबेडकर स्मारक होत नसेल तर सांगा, आम्ही वर्गणी काढून बांधू”

-“सत्ता गेली तरी चालेल पण विचारांशी तडजोड करणार नाही; सावकरांविषयीची भूमिका सेनेला लखलाभ”