असं कोणी लिहून घेत नसतं; अशोक चव्हाण सहज बोलले असतील- रोहित पवार

अकोला | अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडी विषयी केलेल्या वक्तव्याचा शब्दश: अर्थ घेऊन चालणार नाही, असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. ते अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

संविधानाच्या चौकटी राहून हे सरकार चाललं पाहिजेे. तसेच घटनाबाह्य काम करणार नाही हे शिवसेनेकडून लिहून घेतलंय, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. यावर रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे.

असं कोणी लिहून घेत नसतं. अशोक चव्हाण सहज बोलले असतील. हे सरकार पाच वर्षे टिकावं, अशी शिवसेनेसह सर्वांची इच्छा आहे. तसेच पाच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार टीकेल, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, अशोक चव्हाणांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. विरोधकांनी यावर अनोक टीका केल्या.

महत्वाच्या बातम्या-

-महादेव जानकर तुम्ही गप्प बसा… पाशा पटेलांनी दटावलं; पाहा व्हीडिओ

-बायको अन् भावाची धारदार कुऱ्हाडीने केली हत्या; आईने मध्यस्थी केली तर तिच्यावरही हल्ला!

-नागपुरात 19 वर्षीय तरूणीवर बलात्कार…. नंतर गुप्तांगात रॉड टाकून अत्याचार!

-“RSS दहशतवादी संघटना असल्याचे माझ्याकडे पुरावे”

-उदयनराजेंविरोधातील मारहाण-खंडणी प्रकरणी सातारा न्यायालयाने दिला मोठा निर्णय!