मुंबई | ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. यावर शिवसेनेनं सामना अग्रलेखातून भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. शरद पवारांना ‘जाणता राजा’ कसे म्हणता? हा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच विचारायला हवा, असं सेनेनं म्हटलं आहे.
छत्रपती शिवरायांना जनतेचा राजा असं संबोधलं जातं. जनतेच्या प्रश्नांबाबत आणि भावनांबाबत खडांखडा माहिती असलेला लोकनेता म्हणजे जाणता राजा हे शरद पवारांच्या बाबतीत नरेंद्र मोदी यांनीच स्वीकारलं आहे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
सुधीर मुनगंटीवार यांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर नरेंद्र मोदीच देतील. शरद पवार जाणता राजे कसे?, मुनगंटीवार यांनी केलेल्या बालबोध प्रश्नांने पुस्तकावरुन भडकलेल्या वादाची आग कमी होणार नाही, असं म्हणत अग्रलेखातून निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात संतापाची लाट उठल्यावर भाजपवाल्यांनी नमते घेतले आहे. त्यामुळे वादावर पडदा पडला असून पुन्हा कुणी जुनी मढी उकरुन काढणार नाही हीच अपेक्षा, असंही अग्रलेखात म्हणण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक यांची कामगारांना मारहाण – https://t.co/uLC28fV4SZ @nawabmalikncp @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 15, 2020
“महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही आणि ती कुणी करूही शकत नाही” – https://t.co/9VNlzyRac3 @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 15, 2020
सिंचन घोटाळ्यात मी आरोपी नाही- अजित पवार – https://t.co/TgD5iSHfZ2 @AjitPawarSpeaks @NCPspeaks @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 15, 2020