“काँग्रेस सरकारने कसाबला जिवंत पकडून फाशी दिली. देशभक्ती ती हीच!”

मुंबई | संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या मुंबईवरील 26\11 हल्ल्यासंदर्भात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी त्यांच्या पुस्तकात मोठे गौप्यस्फोट केले आहेत. यावरुन मोठं राजकीय वादळ निर्माण झालं असून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपवर बोचरी टीका केली आहे.

प्रग्या ठाकूरसारख्या दहशतवादाच्या आरोपीला पक्षाचे तिकिट देणारे देशद्रोही भाजप आज 26/11 ची फेरचौकशी करण्याची मागणी करत आहे. जे राकेश मारिया यांनी पुस्तकात सांगितले ते कसाबच्या चार्जशीटमध्ये आहे त्यात नवीन काय आहे? मग पाच वर्षे सत्तेत असून चौकशी न करता काय विटीदांडू खेळत होते का?, असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे.

भारतात काही संघटना दहशतवादात सामिल होत्या म्हणूनच पाकिस्तानने त्या अतिरेक्यांना हिंदू नावाचे आयकार्ड दिले. या संघटनांनाच्या दहशतवादातील कारवायांना भाजप सरकारने पाठिशी घातलं आहे. देशद्रोह याला म्हणतात! याउलट काँग्रेस सरकारने कसाबला जिवंत पकडून फाशी दिली. देशभक्ती ती हीच!, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, 26\11 हल्ल्यासंदर्भातील दोषी अजमल कसाब याच्याकडे  समीर चौधरी नावाचं बोगस ओळखपत्र सापडलं होतं.  या ओळखपत्राच्या साहाय्याने मृत दहशतवाद्यांना हिंदू ठरवण्याचा डाव होता. मात्र कसाब जिवंत सापडल्यामुळे हा प्रयत्न फसला, असं राकेश मारिया यांनी पुस्तकात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-ट्रम्प म्हणतात, मोदी आवडतात पण…

-छत्रपती शिवाजी महाराज हे शब्द नाहीत तर मंत्र; अमिताभ बच्चन यांनी दिली शिवरायांना मानवंदना

-नागराज मंजुळे-रितेश देशमुख घेऊन येणार शिवाजी महाराजांची ‘महागाथा’; टीझरद्वारे घोषणा

-शिवजयंतींच्या शुभमहुर्तावर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी केले शिवनेरी किल्ल्यासाठी 23 कोटी मंजूर

-विखे पाटलांच्या फ्लेक्सवरून भाजप गायब, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!