मुंबई | दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्थलांतरित मजुरांशी बोलून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या होत्या. त्यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राहुल गांधींना एवढंही कळू नये की आता गप्पा मारायची वेळ नाही, अशी टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला आजच्या सामनामधून समाचार घेण्यात आला आहे.
राहुल गांधी हे दिल्लीच्या रस्त्यांवर त्या मजुरांसोबत थांबले , थोडा वेळ बसले आणि बोलले. यावर निर्मलाताईंना अत्यंत दु:ख व्हावे हे आक्रितच म्हणावे लागेल, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
कुणी श्रमिकांचे दु:ख हलके करीत असेल तर सरकारला त्याचा आनंद व्हायला हवा, पण इथे उलटेच सुरू आहे, असा टोला त्यांनी निर्मला सीतारामन यांना लगावला आहे.
मंत्री लॉक डाऊन कुरवाळत बसले आहेत. मजूर लॉक डाऊन तोडून कच्च्या-बच्च्यांसह रस्ते तुडवत निघाले आहेत. त्या रस्त्यांवर विरोधी पक्षाचा एक नेता गांधी नावास जागून मजुरांना कवटाळत उभा राहिला याचे ज्यांना दु:ख होते त्यांनी यापुढे माणुसकी व परंपरेच्या गप्पा मारू नयेत, असं टीकास्त्र त्यांनी भाजपवर सोडलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-प्रेक्षकांशिवाय मॅच खेळणं म्हणजे नवरीशिवाय लग्न करणं- शोएब अख्तर
-रोज पत्रकार परिषदा घेताय पण लोकांच्या मुखापर्यंत पॅकेज पोहचेल तो दिवस खरा- संजय राऊत
-मुंबई-पुण्यामधून गावी जाणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हात जोडून विनंती, म्हणाले…
-‘अप्सरा सोनाली’ने दिले आनंदवार्ता… दुबईत पार पडला साखरपुडा!
-मोदीजी, शेतकरी जगला पाहिजे…. शेतकऱ्याला वाचवा; पवारांची पत्रातून आर्त साद