महाआघाडीचं सरकार पाच वर्ष टिकणार; ‘या’ भाजप नेत्याला विश्वास

मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं महाविकास आघाडीच सरकार 5 वर्ष टिकेल, असा विश्वास भाजपचे नेत आणि माजी आमदार सरदार तारासिंग यांनी व्यक्त केला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तारासिंग यांनी आज सकाळी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आहे. यानंतर तारासिंग यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच सरकार 5 वर्ष टिकेल, असं म्हटलंय.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तारासिंग यांना तिकीट नाकारलं होतं. मुलुंड विधानसभेतून तारासिंग निवडून येत होते. सत्ता गेल्यानंतर भाजपच्या काही नेत्यांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु असल्याचीही माहिती आहे.

दरम्यान, मी फक्त उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी आलोय. बाकी कोणतेही तर्क-वितर्क लावण्याची गरज नाही, असं तारासिंग यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-