शरद पवार यांचे सरकावर गंभीर आरोप

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर आता वाढत आहे. राजकीय वातावरण तापत आहे. अशा वातावरणात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सरकावर गंभीर आरोप केलेत. राज्य सरकार हे विरोधकांची हेरगिरी करत आहे असा आरोप शरद पवार यांनी केला. वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केल.

विरोधकांची मुस्कटदाबी करणं, त्यांना नामोहरम करण्यासाठी साम-दाम-दंड या धोरणाचा वापर सरकार करत असून हे अतिशय अयोग्य आहे. महाराष्ट्राचं राजकारण कधीच एवढ्या खालच्या पातळीवर गेलं नव्हतं असं मतही शरद पवारांनी व्यक्त केलं.

विरोधकांवर पाळत ठेवणं असो की त्यांचं फोन टॅपिंग, अशी प्रकरणं आता वाढत आहेत. समजा मी कुणाला फोन करून या निवडणुकीत आम्हाला मदत करा असं सांगितलं तर लगेच काही तासांमध्ये त्या व्यक्तिंकडे Income Taxचे लोक जावून या भानगडीत तुम्ही पडू नका असं त्यांना सांगत असतात. अशी काही उदाहरणं आढळून आली आहेत, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

पक्षातून जे सोडून गेले त्यामुळे फारसा फरक पडणार नाही नवं नेतृत्व तयार होईल असं मतही शरद पवार यांनी या मुलाखतीत व्यक्त केलं.

दरम्यान, महाराष्ट्राच्या प्रचारात राहुल गांधीही सहभागी होतील असंही पवारांनी म्हटंल आहे.

महत्वाच्या बातम्या-