मुंबई | मोदी पंतप्रधान आहेत हे देशाचे अहम भाग्यच पण नोटबंदी आणि लॉकडाउन काळात जे नाहक मेले ते कोणत्या अमृताने जिवंत करणार?, असा सवाल शिवसेनेने सामनाच्या अग्रेलखातून विचारला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या दुसर्या कार्यकाळास एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शिवसेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करण्यात आलं आहे. तसेच काही प्रश्न देखील विचारण्यात आले आहेत.
गेल्या दोन महिन्यांत चुकीच्या पद्धतीने केलेले लॉकडाऊन आणि त्यानंतर स्थलांतरित मजुरांची ससेहोलपट ही फाळणीतील निर्वासितांचीच आठवण करून देणारी आहे. ही चूक कशी दुरुस्त करणार?, असा सवाल शिवसेनेनं केलाय.
मोदी सरकार साधारण सहा वर्ष सत्तेवर आहे. पूर्ण बहुमत असल्याने त्यांचे सरकार पांगुळगाड्याच्या आधारे चाललेले नाही, पण देशाचा मात्र अनेक बाबतीत पांगुळगाडा झाला आहे असा आरोप विरोधक करीत आहेत. दुसर्या कार्यकाळातील पहिल्या वर्धापन दिनानिमित्त भाजप पुढार्यांची विधाने प्रसिद्ध झाली आहेत ती गमतीची आहेत, असं अग्रलेखात म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“अमोल कोल्हेसारख्या व्यक्तीला जो मनस्ताप दिला तो कधीही भरुन निघणार नाही”
-“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजच्या काळातलं सक्षम नेतृत्व, त्यांच्यासमोर टिकेल असे नेते आज नाहीत”
-‘मी वरिष्ठ मंत्र्याच्या कामात लुडबुड करत नाही’; कॉल करणाऱ्या शेतकऱ्याला अजित पवारांचं उत्तर
-अक्षय बोऱ्हाडे-शेरकर वादाच्या कलाटणीनंतर मिटकरींची गरमागरम फेसबुक पोस्ट!
-मला सरकारची चिंता नाही… सरकार कुणी पाडू शकत नाही- उद्धव ठाकरे