उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ सूचक वक्तव्यामुळं पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच???

मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर भाजप-शिवसेनेमध्ये पुढचा मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार यावर सध्या चढाओढ सुरू आहे. त्यात शिवसेना पक्षप्रमुख यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आणखी संभ्रम निर्माण झाला आहे. पुढचं सरकार आपलंच असणार आणि पुढेच…! मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला समजलं असेल असं सूचक वक्यव्य उद्धभ ठाकरे यांनी केलं आहे. त्यामुळे पुढचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असणार अशा चर्चांना उधाण आलं आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळात इलेक्ट्रिसिटीवर चालणाऱ्या पहिल्या बसचा लोकापर्ण सोहळा पार पडला. तर एसटी कामगारांसाठी निवासस्थानांच्या जमिनीचं भूमिपूजन उद्धव ठाकरे यांच्या हस्त करण्यात आले.

परिवहन मंत्री दिवाकर रावतेदेखील उपस्थित होते. पण उद्धव ठाकरेंच्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दांडी मारल्याची चर्चा सध्या सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे युतीच्या चर्चेवरून काही बिनसलं का अशा चर्चांणाही उधाण आलं आहे.

युतीच्या जागा वाटपाचे अंतिम सूत्र अद्याप निश्चित झालेले नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्रितरीत्या बसून त्याबाबत निर्णय घेतील. येत्या 2 दिवसांत जागा वाटपाचे अंतिम सूत्र ठरणार आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात दिली.

दरम्यान, मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलेले वक्तव्य निरर्थक असल्याचेही महाजन यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे पुढचा मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार यावर अद्याप संभ्रम आहे.

महत्वाच्या बातम्या-