तुमचं 3 महिन्यात सरकार जाणार मग कर्जमाफी कधी करणार??; विनायक मेटेंची टीका

नाशिक |   शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणार, अशी घोषणा झाली. कधी होणार आहे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती?? हे सरकार तीन महिन्यांत कोसळणार आहे, अशी टीका शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते.

महाराष्ट्रात स्थापन झालेलं महाविकास आघाडीचं सरकार 3 महिन्यांत कोसळणार असं सांगत असताना त्यांच्या मतभेदामुळेच ते कोसळेल, असा अंदाजही त्यांनी बांधला आहे. शिवसंग्रामचा 18 वा वर्धापनदिन करण्यासाठी त्यांनी नाशिकमध्ये बैठक बोलावली होती. यावेळी पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेना आता सत्तेत आली आहे. आत्तापर्यंत शिवसेनेने तिथीनुसार शिवजयंतीचा आग्रह धरला. आता त्यांनी 19 फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करावी, असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं.

दरम्यान, ‘सारथी’मधील गैरव्यवहाराची नि:पक्ष चौकशी व्हावी तसंच आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा तरूणांच्या आंदोलनची सरकारने दखल घ्यावी, असंही मेटे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-दिल्लीचा गड आम्हीच काबीज करणार; रावसाहेब दानवेंना विश्वास

-महाराज असते तर आज काय शिक्षा केली असती??; आता बस्स…; संभाजीराजेंना भावना अनावर

-आशिष शेलारांनी घेतला पुन्हा शिवसेनेशी पंगा; शिवसेनेवर केली सडकून टीका

-नरेंद्र मोदी एक दिवस ताजमहाल सुद्धा विकायला बसलेत; राहुल गांधींची टीका

-पवारसाहेबांना पंतप्रधान बनवायचंय… कामाला लागा; रोहित पवार यांचे कार्यकर्त्यांना आदेश