“मला पोलीस सुरक्षा नको, आत्ताच्या घडीला महाराष्ट्राला त्यांची जास्त गरज आहे”

मुंबई |  कोरोनाचं महाराष्ट्रावर सध्या भीषण संकट आहे. अशा परिस्थितीत जनतेसाठी सरकारने काही आदेश दिले आहेत. जनतेने आदेशाचं उल्लंघन करू नये यासाठी सध्या पोलीस अहोरात्र मेहनत करत आहेत. पोलिसांवर याचा अधिक ताण आहे. अशा परिस्थितीत मला सध्या पोलीस सुरक्षा नको. माझी पोलीस सुरक्षा काढून घेण्यात यावी, अशी विनंती करणारं पत्र भाजप नेते विनोद तावडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं आहे.

गेल्या आठवड्याभरापासून राज्यावर आलेल्या संकटाच्या परिस्थितीत पोलिसांवर अतिरिक्त ताण आहे. अशाही काळात नागरिक आपले कर्तव्य विसरून वागत आहेत. अशा वेळी पोलिसांवरचा ताण अधिकच वाढतो आहे. म्हणून मला पोलीस सुरक्षा नको असा निर्णय मी घेतला असल्याचं तावडे यांनी सांगितलं आहे.

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी पोलीस प्रयत्नांची शिकस्त करत आहे. या कामात मदत व्हावी म्हणून मी माझी पोलीस सुरक्षा काढून घेण्याची विनंती मुंबई पोलीस आयुक्तांना केली आहे, असं तावडे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, राज्यातील इतर नेत्यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून स्वत:ची सुरक्षा कमी करावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे. दुसरीकडे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या जोरात वाढायला लागली आहे. रविवारी 74 कोरोनाबाधित होते. आज हा आकडा वाढून तो थेट 89 वर पोचहला आहे. यावरून गुणाकार स्वारूपात कोरोना पसरतो आहे, हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने अत्यावश्यक काम नसता घरात बसणं कर्मप्राप्त झालं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोनाला हरवण्यासाठी नागरिकांनी घरीच थांबावं म्हणून शरद पवारांनी दिला हा संदेश

-“सरकार गंभीर होगी तो जनता गंभीर होगी”

-“पाकिस्तानमध्ये आम्ही लॉकडाउन करु शकत नाही”

-#Corona | लालबाग गणेश मंडळ पुढे सरसावलं; रक्तदान शिबिराचं केलं आयोजन

-“परिस्थिती गंभीर असली तरी सरकार खंबीर आहे”