मुंबई | सध्या सुशांत सिंहच्या आत्महत्येवरून चांगलच राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहे. दरम्यान आत्ता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या प्रकरणावरून मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न्नचिन्ह केल्याप्रमाणे ट्विट केलं होतं. यावर युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी अमृता फडणवीसांना चांगलच सुनावलं आहे.
मॅडम, तुम्ही आणि तुमच्या कुटूंबानी यच पोलीस खात्याचं संरक्षण घेतलं होतं. मात्र आता याच पोलिस खात्याच्या संरक्षणावर असे नीच आरोप करता.जर भरवसा नसेल तर सोडून द्या मग पोलीस संरक्षण, असं म्हणत युवासानेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई यांनी अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.
तुम्ही मुंबई पोलिसांच्या उमंग या कार्यक्रमात नाचल होतात आणि गायलाही होतात. किती कृतघ्न होणार?, असंही वरूण सरदेसाई यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास ज्या प्रकारे सुरू आहे, त्यावरून मला असं वाटतं की मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं होतं. यावरून वरूण सरदेसाई यांनी अमृता यांच्यावर निशाणा साधला आहे. यावर अमृता फडणवीस काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय ह्याच मुंबई पोलिसांची Security Cover घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता??
सोडून द्या की security cover भरोसा नसेल तर !! https://t.co/ITw8AKLN0P
— Varun Sardesai (@SardesaiVarun) August 3, 2020
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! पुण्यात पोलिसांनीच घडवून आणला शेतकऱ्यावर खुनी हल्ला अन् मग…
अयोध्या राममंदिरातील रामाच्या मूर्तीला मिशा असाव्यात; संभाजी भिडेंची मागण
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येबाबत अमृता फडणवीस यांचं महत्वाचं ट्विट; म्हणाल्या…
चीनकडून युद्धाचे संकेत; सीमेलगत अण्वस्त्रवाहू विमाने, फायटर विमाने तसेच हजारो सैन्य तैनात