दहिहंडी उत्सवात 140 गोविंदा जखमी; एकाचा मृत्यू

मुंबई | राज्यात एकूण 140 गोविंदा जखमी झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. दहिहंडी उत्सवात मुंबईत जखमी झालेल्या 119 गोविंदांपैकी 93 जणांवर उपचार करून घरी सोडण्यात आलं आहे. तर 26 जणांना रुग्णालयात दाखल केलं आहे.

मुंबई शहर-उपनगरातील 119 तर ठाण्यातील 21 असे एकूण 140 गोविंदा जखमी झाले होते. दरम्यान, रायगडमध्ये पाचव्या थरावरून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. राज्यातील पूरस्थितीमुळे शहर-उपनगरातील अनेक आयोजकांनी यंदा गोविंदा उत्सव रद्द केले होते. त्यामुळे लाखोंची बक्षिसे मिळवणारा गोविंदाही नाराज झाला होता.

गोविंदा उत्सवात 14 वर्षाखालील गोविंदांना उत्सवात सहभाही होण्याची परवानगी नसतानाही मुंबई उपनगरात पाच बालगोविंदा जखमी झाले. त्यातील दोन जणांना रुग्णालयात दाखल केले असून तिघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दहीहंडी उत्सवादरम्यान अनेक गोविंदांनी वाहतुकीचे नियम मोडीत काढले होते. या सर्वांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे.

महत्वाच्या बातम्या-